Talathi Bharti 2022 Maharashtra । राज्यात 3165 जागांसाठी तलाठी भरती : पहिल्या टप्प्यात 1012 जागा
Talathi Bharti 2022 Maharashtra – राज्यातील विद्यार्थ्यांनासाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे तलाठी भरती होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली की, राज्यात लवकरच 3165 जागांसाठी तलाठी भरती होणार आहे.
या पदभरतीसाठी मंत्रीमंडळाने देखील मंजुरी दिलेली आहे. तर ही तलाठी भरती विविध टप्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार पदांसाठी तलाठ्यांची भरती केल्या जाणार आहे.
भरपूर विद्यार्थी तलाठी भरतीची वाट पाहत होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठ्यांच्या जागा रिक्त आहे. यामुळे महसूल कार्यालयावर कामाचा ताण वाढलेला आहे.
किती पदांची Talathi Bharti 2022 होणार –
ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन सरकारने तलाठी भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकूण 3165 पद भरली जाणार आहे. गावांचे अर्थकारण व मालमत्ताचा लेखाजोखा ठेवण्याचे काम, महसूल नोंदी व कर वसुली, सात-बारा उतारा व ऑनलाईन कामकाज तलाठी करत असतो.
संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, पुरवठा विभाग व पिकांचे पंचनामे करणे हे काम देखील तलाठ्यालाच करावे लागते. तलाठी भरती टप्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार पदांसाठी भरती होणार असे सांगितले. पण ही भरती कधी होणार हे अजून सांगितलेले नाही.
परंतु 2022 मध्ये ही भरती केल्या जाणार आहे. तर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती 2022 कधी होईल हे नक्की सांगितले नाही. परंतु तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारीला लागा.
[email protected]
Talathi Bharti
10,12 pass
[email protected]
Hi