पीएम कुसुम योजना
चर्चेत का आहे?
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (PM KUSUM) अंतर्गत ऑफ-ग्रीड सौर पंप बसवणारे हरियाणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
तसेच पीएम-कुसुम योजनेअंतर्गत शेती आधारित सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राजस्थानमधील भालोजी या गावात १ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प स्थापित करण्यात आला.
काय आहे योजना ?
PM KUSUM – Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyaan
सुरुवात – २०१९
मंत्रालय – केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
उद्दिष्ट – शेतकऱ्यांना आर्थिक आणि पाणी सुरक्षा प्रदान करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.
लक्ष्य २०२२ पर्यंत २५,७५० मेगावॅट सौर आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडणे
एकूण केंद्रीय आर्थिक सहाय्य – ३४,४२२ कोटी रुपये.
योजनेचे घटक –
- १०,००० मेगावॅट ओव्हरहेड विकेंद्रीकृत ग्रिडला अक्षय ऊर्जा संयंत्रांशी जोडणे. (संयंत्राचा आकार २ मेगावॅट पर्यंत)
- १७.५० लाख सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप बसवणे. (पंप क्षमता ७.५ एचपी पर्यंत)
- १० लाख ग्रिड जोडलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचे सोलरायझेशन. (पंप क्षमता ७.५ एचपी पर्यंत)