राजस्थानमध्ये Statue of Peace चे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Statue of Peace चे राजस्थान मध्ये नुकतेच अनावरण केले.
१. जैनचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून Statue of Peace अनावरण करण्यात आले.
२. अष्टधातू म्हणजेच 8 धातूंनी बनविलेला Statue of Peace पुतळा 151 इंच उंच आहे तर यात प्रमुख घटक तांबे आहे.
जैनचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्याबद्दल –
- 1870-1954 या कार्यकाळात त्यांनी भगवान महावीरांचा संदेश देण्यासाठी निस्वार्थ व समर्पितपणे कार्य केले.
- त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अविरतपणे काम करण्यासोबतच, शिक्षण क्षेत्रात सुद्धा भरीव योगदान दिले आहे. तसेच चुकीच्या सामाजिक रीतींना दुर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी प्रेरणादायी लिखाण (कविता, निबंध, भक्ती स्तोत्रे आणि स्तवन) करून स्वातंत्र्य चळवळीला आणि स्वदेशी मोहिमेला पाठिंबा दिला.