२६ मे नंतर भारतात फेसबुक, ट्विटरवर बंदी येणार ? काय आहे नेमकं कारण ?

भारत सरकारने २५ फेब्रुवारी रोजी एक आदेश जारी केलेला. ह्या आदेशानुसार फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या कंपन्यांना काही नवे नियम लागू करण्यासाठी ३ महिन्यांची मुदत दिलेली. हि ३ महिन्यांची मुदत २६ मे रोजी संपणार असून कंपन्यांनी अजूनही नवीन नियम लागू केले नसल्याने लोकांमध्ये फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम, सोशल मीडियावर बंदी होणार या अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय आहेत नवीन नियम ?

  • तक्रारींचं समाधान करण्यासाठी विशेष अधिकारी, नोडल अधिकारी यांची नियुक्ती
  • आपत्तीजनक पोस्टवर लक्ष ठेवणे
  • संबंधित अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र भारतातच असावं
  • तक्रार २४ तासांच्या आत नोंदवून १५ दिवसात ती निकाली काढावी
  • कुठल्याही प्रकारची आपत्तीजनक पोस्ट हटवण्यापूर्वी ज्याने ती पोस्ट टाकलीय त्याला माहिती द्यावी

“आम्ही सरकारने दिलेल्या नियमाचं पालन करू, परंतु काही मुद्यांवर चर्चा करून आम्ही सरकार पुढे आमचे म्हणणे मांडू”, असे फेसबुकने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole