चालू घडामोडी – 14 मे 2021
तक्रार निवारण समिती नेमा
- येत्या ४८ तासांत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, लसधोरण स्पष्ट करावे, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकार ला दिले.
- खंडपीठाने उत्तरप्रदेशातील कोरोना स्थितीची दखल घेतली.
- राज्यातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये न्यायिक अधिकारी नेमण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
- हे ९ जण विभागीय अधिकारी म्हणून काम करतील व दार आठवड्याला न्यायालयाला माहिती देतील.
- प्रत्येक जिल्ह्यातील तीन सदस्यांची ‘महामारी सार्वजनिक तक्रार निवारण मंच स्थापन करावा असे आदेश ही कोर्टाने दिले आहेत.
- या समितीत मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हा न्यायाधीशांनी नामनिर्देशित केलेले समक्ष न्यायिक अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकव अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारांच्या समकक्ष जिल्हा प्रशासकीय अधिकारी हे लोक असतील.
- दिलेल्या आदेशांवर येत्या ४८ तासांत अंमलबजावणी करण्यात यावी हे ही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती
- राज्यातील प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून देशातील प्राणवायू निर्मितीचा पहिला प्रकल्प यशस्वी झाला.
- रुग्णांना देण्यासाठी आवश्यक प्राणवायूचे प्रमाण ९५ वर गेले आहे.
- या प्रकल्पाच्या यशापयशावर बाकी प्रकल्पाचं भविष्य अवलंबून होतं, आता २८ ते ३० टन प्राणवायू प्रकल्प उभे करण्याच्या कामाला वेग येणार आहे.
- आता धाराशिव साखर कारखान्यातून दररोज १६५ घनमीटर प्राणवायू तयार होणार आहे. जम्बो सिलेंडरमुळे ७ घनमीटर प्राणवायू भरला जातो.
मिशन ऑक्सिजन
- ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं.
- महाराष्ट्रासह अन्य सर्वच राज्यात दुसऱ्या लाटेचा जोरदार सामना केला जात आहे.
- राज्यात ३ हजार मेट्रिक टन प्राणवायू उत्पादनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
- महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजुर करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
- सध्या महाराष्ट्राला १८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागते. जवळपास १३०० मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती इथे होते. उरलेला प्राणवायू इतर राज्ये व केंद्राच्या मदतीने उपलब्ध केला जात आहे.
- महाराष्ट्राला स्वावलंबी होण्यासाठी ३८२ PSA प्लांटस ची स्थापना करण्यात येणार आहे व २४० मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्रात सर्वात मोठे उपाय योजना केंद्र
- पुण्यातील माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील ३२ बिबट्यांची कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.
- दिवसातून ३ वेळा बिबट्यांची तापमापकाने तपासणी केली जात आहे, गरज पडल्यास त्याची कोरोना चाचणीही केली जाईल.
- माणिकडोह हे बिबट्यांचे सर्वात मोठे निवारा केंद्र आहे.
- मार्जार कुळातील प्राण्यांना कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात असताना भारतीय वन्यजीव प्राधिकरणाकडून सर्व प्राणीसंग्रहालये व निवारा केंद्रे यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- या निवारा केंद्राने ‘वाईल्डलाईफ एसओएस’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे ज्याद्वारे या केंद्राला तांत्रिक मदत मिळेल.