चालू घडामोडी – 11 मे 2021
चीन कडून २०१५ मध्ये कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून विचार…
- कोरोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याचा विचार २०१५ मध्येच चिनी लष्करी वैज्ञानिकांनी केला होता.
- तिसरे जागतिक महायुद्ध जैविक अस्त्रांचे असेल असे भाकीत सुद्धा त्यावेली चिनी वैज्ञानिकांनी केले होते.
- अशी माहिती असलेली कागदपत्रे अमेरिकी परराष्ट्र खात्याला मिळाली आहेत, सायबर तज्ज्ञांनी शहानिशा करून ही कागदपत्रे खरी असल्याचं सांगितलं आहे.
- ब्रिटनच्या ‘द सन’ त्याचबरोबर ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्रांनी प्रसारित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती दिली.
- कोविड १९ विषाणू कुठून आला याची पाळंमुळं शोधून काढण्याचं काम अमेरिकेने हाती घेतलं आहे.
- त्या कागदपत्रांत सार्स कोरोना विषाणूचे उदाहरण चिनी वैज्ञानिकांनी जैविक अस्त्र म्हणून दिले होते.
- कोरोना विषाणूंचा खूप मोठा समूह असून त्यामुळे सध्या सर्दीपासून ते गंभीर श्वसन रोग होऊ शकतात. यांत सार्सचा ही समावेश आहे.
- पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या कागदपत्रांत सांगण्यात आलं आहे की जर जैविक अस्त्रांचा वापर केल्यास शत्रूची वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडेल.
- २००३ मध्ये कोरोनाचा विषाणू सार्सच्या रूपाने चीन मध्ये आला होता
- त्याचं मानवनिर्मित आवृत्ती तयार केली तर ते उत्तम जैविक अस्त्र ठरू शकते. व दहशतवाद्यांनाही ते मागे टाकेल असा उल्लेख त्या कागदपत्रांत आहे.
कोरोनामुळे पालक मागवलेल्या बालकांसाठी कृतीगट
- कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सरंक्षण, संगोपन, शिक्षण व इतर अनुषंगिक समस्या सोडवण्यासाठी
- जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृतीगट स्थापन करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.
- कोरोनामुळे अनाथ होणाऱ्या बालकांची देशभर मोठी समस्या निर्माण होत आहे.
- त्याचबरोबर ती एक सामाजिक समस्याही बनत चालली आहे.
- तर अशा अनाथ मुलांची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे.
- अनाथ बालकांची तपशीलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले जातील.
- ही अनाथ बालके शोषणास बळी पडणार नाहीत, बालकामगार अथवा तस्करीसारख्या गुन्ह्यांमध्ये सापडणार नाहीत याबाबत दक्षता घेणे.
- व या मुलांच्या दत्तकविधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
देशात लसीकरण मोफत
- कोरोना लसीकरण धोरण तज्ज्ञ वैद्यकीय व शास्त्रीय मतांच्या आधारे आखण्यात आले आहे.
- त्यात न्यायिक हस्तक्षेपाला फारसा वाव नाही असे म्हणत या धोरणाचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले.
- देशांतील सर्व वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल असेही न्यायालयात सांगण्यात आले.
- ज्या अभूतपूर्व व विशिष्ट परिस्थितीत लसीकरण मोहिमेचे व कार्यपलिकेचे धोरण म्हणून आखणी करण्यात आली आहे. त्यावर विश्वास ठेवायला हवा असं केंद्राने सांगितलं.
- हे धोरण चांगल्या हेतूने आखलं असून कुठल्याही अतिउत्साही हस्तक्षेपाचे अकल्पित व अहेतूक परिणाम होऊ शकतील. असे मत केंद्रातर्फे नोंदवले गेले.
- ही याचिका न्यायालयानं स्वतःच नोंदवून घेतली आहे.
- लसीकरणाचे धोरण घटनेच्या कलम १४ व २१ अनुरूप असून ते तज्ज्ञ, सर्व राज्यसरकारे, लस उत्पादकांशी चर्चेच्या फेऱ्यानंतर तयार करण्यात आले आहे.
- न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. कारण या महासाथीचा सामना करताना कार्यपलिकेला मुक्तपणे काम करण्याची मोकळीक असते, असेही केंद्राने म्हणाले आहे.
आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वसर्मा
- एनईडीए अर्थात ईशान्य लोकशाही आघाडीचे निमंत्रक हेमंत बिस्व सर्मा हे आसामचे नवे मुख्यमंत्री असतील.
- एकमताने त्यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- मावळते मुख्यमंत्री सर्बानंद सोनेवाल हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
- मागील मंत्रिमंडळात सर्मा हे आरोग्यमंत्री होते. कोरोनाची साथ रोखण्याच्या कामातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
- २००१ मध्ये पहिल्यांदा जालूकबारी मतदारसंघातून सर्मा आमदार झाले. २०१५ मध्ये काँग्रेसी मुख्यमंत्री तरुण गोगोई सरकारमधून बाहेर पडून भाजप मध्ये प्रवेश केला.
- २०१६ व २०२१ मध्ये दोन्ही वेळेस भाजप आसाम मध्ये सत्तेत आली त्याचं श्रेय हे सर्मा यांना आहे.
- ईशान्य भारतात भाजपचा पाया रोवल्यामुळे ईशान्य भारतातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार म्हणून सर्मा यांना ओळखलं जातं.
ऑक्सिजन एक्सप्रेसची विक्रमी धाव
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात उत्तरदक्षिण उद्भवलेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसची धाव वाढत आहे.
- ८ मे ला या एक्सप्रेस मधून ४१ टँकरद्वारे ७१८ मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक झाली.
- या वेळी दैनंदिन ऑक्सिजन वाहतुकीचा एक्सप्रेसचा विक्रम आहे अशी माहिती रेल्वेने दिली.
- दिल्ली,उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रालाही सर्वाधिक म्हणजे २९३ मेट्रिक टन ऑक्सिजन आतापर्यंत पोहोचवला गेला आहे.
- पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस कानपूर ला पाठवण्यात आली.
- आजवर एकूण २६८ टँकर्सद्वारे ४२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा या एक्सप्रेसच्या साहाय्याने करण्यात आला आहे.