राज्यातील सर्व लिपिक पदांसाठी एकच परीक्षा, MPSC मार्फत भरती.
सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार आता राज्यातील सर्व लिपिक संवर्गातील पदांसाठी एकच परीक्षा ठेवण्याचा विचार करत आहे आणि हि भरती MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्याचा सकारात्मक विचार चालू असल्याचेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत अनेक प्रश्नावर विचारमंथन करण्यासाठी ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्यावेळी हि माहिती देण्यात आली.
राज्यातील गट अ आणि गट ब म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि कर निरीक्षक तसेच मुंबई महानगरपालिका लिपिक पदांसाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येते पण राज्यातील उर्वरित लिपिक संवर्गातील पदांची भरती स्थानिक पातळीवर घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येकवेळी नवीन अर्ज करावा लागतो आणि आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागतो. सध्या राज्यातील विद्यार्थ्यांकडून एकच परीक्षा MPSC मार्फत घ्यावी अशी विनंती करण्यात येत आहे आणि त्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समोर आले आहे.