सौभाग्य योजना (SAUBHAGYA)
चर्चेत का आहे?
२५ सप्टेंबर २०२१ रोजी सौभाग्य योजनेच्या (SAUBHAGYA) यशस्वी अंमलबजावणीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
योजना सुरू झाल्यापासून ३१ मार्च २०२१ पर्यंत २.८२ कोटी घरांमध्ये विद्युतीकरण पूर्ण झाले.
काय आहे योजना ?
SAUBHAGYA – Pradhan Mantri Sahaj Bijli Har Ghar Yojana
SAUBHAGYA जगातील सर्वात मोठी घरगुती विदयुतीकरण मोहीम.
घोषणा २५ सप्टेंबर २०१७ (पंडित दीन दयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी)
संबंधित मंत्रालय – केंद्रीय ऊर्जा मंत्रालय
उद्दिष्ट – ग्रामीण भागातील वीज उपलब्ध नसलेल्या सर्व घरांना आणि शहरी भागातील गरीब घरांना वीज उपलब्ध करून देशातील सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण करणे.
योजना देशभर कार्यान्वित करण्यासाठी प्रमुख संस्था ग्रामीण विदयुतीकरण महामंडळ मर्यादित (REC)
योजनेचा एकूण खर्च – १६३२० कोटी रुपये (सकल अर्थसंकल्पीय सहाय्य १२३२० कोटी रुपये)